प्रमोद कांबळे यांची मुर्तीकार बनण्याची प्रबळ इच्छा त्यांना जे जे स्कुल ऑफ आर्टला घेऊन गेली. जेथे त्यांनी मुर्तीकला आणि मॉडेलिंग डिप्लोमा पुर्ण केला. शैक्षणीक काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले तसेच या काळात त्यांनी विविध कला दिगर्द्शका सोबत कामही केले. नंतर त्यांनी अहमदनगर मध्ये येऊन त्यांचा स्टुडिओ सुरु केला.
प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फुट X १७ फुट अशा एका अहमदनगर महानगरपालिकेच्या महावीर कलादालनातील मोठ्या भिंतीवर काढली आहेत. केवळ पेन्सिलीच्या साहाय्याने १९९७ साली काही महिन्यामध्ये त्यांनी हे जगातील सर्वात मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी हे चित्र त्यांनी राष्ट्राला अर्पण केले.
No comments:
Post a Comment